भारतीय शास्त्रांचे ज्ञान संस्कृत ग्रंथांमध्ये साठवलेले असल्याने त्यांच्या अभ्यासासाठी संस्कृत भाषेचे ज्ञान आवश्यक असते. गणित किंवा विज्ञान शास्त्रज्ञांना संस्कृत भाषा अवगत नसल्याने त्यांना या ग्रंथांचा अभ्यास करणे कठीण असते. त्यामुळे भारतीय संस्कृतीचा प्रचार करायचा असल्यास या ग्रंथांना संस्कृतमधून मराठीत भाषांतर करण्याची गरज आहे, त्यामुळे या शास्त्रांचे भव्य दालनही सर्वांसाठी खुले होईल, असे प्रतिपादन प्रा. मोहन आपटे यांनी केले.
↧