सध्याच्या काळात मंदिरं नकोत रुग्णालये, महाविद्यालये हवीत अशा मागण्या होत असतात. रुग्णालये, महाविद्यालये यांच्या इतकीच मंदिरंदेखील महत्वाची आहेत. रुग्णालयं शरीरावर इलाज करत असतील तर मंदिरांमध्ये मनावर इलाज होता. मंदिरातल्या वातावरणातून मनाची जडणघडण होत असते आणि त्यातून जीवनाला उभारी मिळते म्हणूनच मंदिरांची गरज समाजास आजही आहे, असे मत ब्रह्मांडनायक या मालिकेत गजानन महाराजांची भूमिका साकारणारे अभिनेते वसंतराव गोगटे यांनी व्यक्त केले.
↧