Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 44332 articles
Browse latest View live

भोईरांच्या उमेदवारीने शिवसैनिक नाराज

$
0
0

म. टा. वृत्तसेवा कल्याण

विद्यमान आमदार सुभाष भोईर यांना शिवसेनेने पुन्हा उमेदवारी दिल्याच्या निषेधार्थ ग्रामीण भागातील ६३ गावच्या पदाधिकाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. रमेश म्हात्रे यांना पक्षाने उमेदवारी दिली नाही तर भोईर यांचे काम न करता त्यांच्या विरोधात प्रचार करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला.

मागील निवडणुकीत राष्ट्रवादीकडून शिवसेनेत आलेल्या भोईर यांनाच पुन्हा शिवसेनेने कल्याण ग्रामीण मतदारसंघातून उमेदवारी दिल्यामुळे ग्रामीण भागातील शिवसैनिकांमध्ये नाराजी आहे. या भागात मागील पाच वर्षांत कोणतेही काम न करता खासदार शिंदे आणि पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेल्या कामाचे श्रेय लाटण्याचा प्रयत्न सुभाष भोईर यांनी केला आहे. स्वातंत्र्याला ७२ वर्षे उलटली मात्र तरीही १४ गावांतील नागरिकांना पिण्याचे पाणी नाही. आमदार म्हणून या भागातील पाण्याचा प्रश्न सोडविण्याचे कोणतेही प्रयत्न त्यांनी केलेले नसून कोणत्याही शिवसैनिकांना भोईर विश्वासात घेत नसल्याचा आरोप पदाधिकाऱ्यांनी केला. वाकळण गावचे सरपंच अनिल भोईर, कल्याण ग्रामीणचे तालुकाप्रमुख एकनाथ पाटील यांच्यासह रमेश म्हात्रे यांच्या शेकडो समर्थक स्थानिक शिवसैनिकांनी भोईर यांच्या विरोधात घोषणाबाजी करत आपला संताप व्यक्त केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


बिजांकुर कंपनीविरोधात गुन्हा

$
0
0

शेकडो ठेवीदारांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक

म. टा. वृत्तसेवा, नवी मुंबई

गुंतवणूकदारांना मोठ्या परताव्याचे आमीष दाखवून मुदतीत ठेवीचा परतावा न करता शेकडो ठेवीदारांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी खारघर पोलिसांनी बिजांकूर ग्रुप ऑफ कंपनीविरोधात फसवणुकीसंदर्भात फौजदारी गुन्हा दाखल केला आहे. ज्या ठेवीदारांना त्यांच्या ठेवीच्या परताव्याची रक्कम मिळालेली नाही त्यांनी गुंतवणुकीचे प्रमाणपत्र, आधार कार्ड व पॅन कार्डची छायांकित प्रत घेऊन खारघर पोलिस ठाण्यात संपर्क साधण्याचे आवाहन खारघर पोलिस ठाण्याचे वरीष्ठ पोलिस निरीक्षक प्रदीप तिदार यांनी केले आहे.

बिजांकुर ग्रुप ऑफ कंपनीने नवी मुंबई, ठाणे, रायगड आणि पालघर परिसरातील शेकडो नागरिकांना खोट्या आर्थिक योजनांची माहिती देऊन बाजारभावापेक्षा जास्त मोबदला देण्याचे आश्वासन देवून ठेवीच्या स्वरूपात कोट्यवधी रुपये जमा केले आहेत. परंतु दिलेल्या मुदतीत कंपनीने ठेवीदारांना परताव्याची रक्कम परत न केल्याच्या अनेक तक्रारी खारघर पोलिसांना प्राप्त झाल्या आहेत. त्यामुळे, गुंतवणूकदारांनी केलेल्या तक्रारींनुसार बिजांकुर ग्रुप ऑफ कंपनीविरोधात खारघर पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तिरूपती देवस्थानतर्फे अंबाबाईला मानाचा शालू

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

गांधी जयंतीच्या सुट्टीचे औचित्य साधून बुधवारी दिवसभरात दीड लाख भाविकांनी अंबाबाईचे दर्शन घेतले. सकाळपासूनच मंदिरात प्रचंड गर्दी झाली. दरवर्षीप्रमाणे तिरूपती बालाजी देवस्थानच्यावतीने अंबाबाईसाठी देण्यात येणारा मानाचा शालू तिरूपती देवस्थानचे अध्यक्ष खासदार वाय. व्ही.सुब्बारेड्डी यांच्या हस्ते अंबाबाई देवस्थानचे अध्यक्ष महेश जाधव यांनी स्वीकारला. यावेळी सुवर्णलता सुब्बारेड्डी, देवी सुब्बारेड्डी, तिरूपती समन्वय समितीचे अध्यक्ष रिषी पांडे यांच्यासह अंबाबाई देवस्थानच्या कोषाध्यक्ष वैशाली क्षीरसागर, सदस्य शिवाजीराव जाधव, राजू जाधव आदी उपस्थित होते.

दरम्यान, ललितापंचमीनिमित्त त्र्यंबोली यात्रेची तयारी पूर्ण झाली आहे. सलोनी गुरव या कुमारिकेच्या हस्ते कोहळा फोडण्याचा विधी होणार आहे. यासाठी सकाळी दहा वाजता अंबाबाईची उत्सवमूर्ती असलेली सुवर्णपालखी त्र्यंबोली भेटीसाठी जाणार आहे. भवानी मंडपातील तुळजाभवानी मंदिरातील तुळजाभवानीची बुधवारी वनविहार करणारी सिंहवाहिनी रूपात सालंकृत पूजा बांधण्यात आली होती.

दरम्यान, मंगळवारी तोफेची सलामी देताना जखमी झालेल्या करण मुकुंद पवार याच्यावर उपचार सुरू असून त्याची प्रकृती स्थिर आहे. तोफेची सलामी देतानाचा व्हिडिओ बनवत असताना करण जखमी झाला होता.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पाळणाघरात मुलीशी गैरप्रकार

$
0
0

ठाणे : एटीएम सेंटरच्या सुरक्षारक्षकाने पाळणाघरातील चार वर्षांच्या मुलीशी गैरप्रकार केल्याचा प्रकार यशोधननगर परिसरात घडला. पोलिसांनी सुरक्षारक्षकाला अटक केली.
पीडित मुलीची आई ब्युटी पार्लरचा कोर्सला जात असल्याने मुलीला यशोधननगर नाका येथून लोकमान्यनगरला जाणाऱ्या रोडवर असलेल्या एक सोसायटीमधील पाळणाघरात ठेवत होती. याच सोसायटीसमोर एका बँकेचे एटीएम सेंटर आहे. या सेंटरमध्ये दशरथ कांबळे (४२) सुरक्षारक्षक म्हणून काम करतो. पाणी आणण्यासाठी तसेच अन्य काही काम असल्यास तो या पाळणाघरात कायम येत-जात असे. २९ सप्टेंबरला दशरथ पाळणाघरात आला. यावेळी तीन मुले होती. तो पीडित मुलीला अभ्यासाला घेऊन बसला. यावेळी त्याने मुलीसोबत गैरप्रकार केल्याची माहिती पोलिस निरीक्षक संतोष घाटेकर यांनी दिली. वर्तकनगर पोलिस ठाण्यात कांबळेविरुद्ध पोक्सोअंतर्गत गुन्हा दाखल करत त्याला मंगळवारी अटक केली. आरोपीला न्यायालयाने ५ ऑक्टोबरपर्यंत पोलिस कोठडी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

उल्हासनगरच्या जागेवरून संभ्रम कायम

$
0
0

भाजप निष्ठावंत, कलानी समर्थकांचा जीव टांगणीला

म. टा. वृत्तसेवा, उल्हासनगर

उल्हासनगर विधानसभेच्या जागेवरून शिवसेना आणि भाजपच्या वरिष्ठांनी कमालीची गुप्तता पाळल्याने उल्हासनगर शहरातील राजकीय वर्तुळात संभ्रमाचे वातावरण आहे. जागा शिवसेनेला सोडायची की भाजपला, त्यातही भाजपला जागा सोडल्यास ती माजी आमदार कुमार आयलानी यांना तिकीट द्यायचे की, भाजपच्या तिकिटाच्या आशेवर असलेल्या कलानी कुटुंबाला द्यायचे, याबाबत अद्याप तोडगा न निघाल्याने समर्थकांचा जीव टांगणीला लागला आहे. अर्ज भरण्यासाठी अखेरचे दोनच दिवस शिल्लक राहिल्याने इच्छुक उमेदवार हतबल झाल्याचे चित्र आहे. युतीच्या गोपनीयतेच्या धोरणामुळे इतर पक्षांचे दरवाजेही बंद होण्याची भीती असल्याने इच्छुक चिंतेत आहेत.

राज्यात विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेना आणि भाजप युती झाली असली तरी राज्यातील काही जागांचा तिढा अद्याप सुटत नसल्याचेच चित्र आहे. त्यात उल्हासनगर विधानसभा मतदारसंघाचा समावेश आहे. उल्हासनगर विधानसभा मतदारसंघ गेल्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने जिंकला. यावेळी मोदी लाट असतानाही भाजप आमदार कुमार आयलानी यांना पराभवाचा धक्का बसला. त्यामुळे भाजपची नाचक्की झाली. त्यानंतर भाजपने उल्हासनगर मतदारसंघासह पालिकाही आपल्याकडे कशी येईल, याची चाचपणी सुरू केली. भाजपने सुरुवातीला २०१७मध्ये उल्हासनगर महापालिका निवडणूक जिंकत भाजपचा महापौर बसवला. त्यासाठी एकेकाळचे कट्टर विरोधक असलेल्या कलानी कुटुंबाला जवळ केले. विद्यमान आमदार ज्योती कलानी यांनी राष्ट्रवादीच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे पंचम कलानी किंवा ओमी कलानी यांना विधानसभेचे तिकीट मिळण्याची दाट शक्यता आहे. गेल्या निवडणुकीत पराभूत होऊनही शहरात पक्ष जिवंत ठेवणाऱ्या माजी आमदार कुमार आयलानी यांनाही तिकिटाची आशा आहे. त्यांच्यामागे भाजप निष्ठावंतांची आणि जुन्या कार्यकर्त्यांची मोठी फळी आहे. राज्यभरात तिकीटवाटप सुरू असताना उल्हासनगरच्या जागेचा निर्णय अद्याप होऊ शकलेला नाही. ही जागा शिवसेनेला सोडावी, अशी मागणी सातत्याने शिवसेनेचे विविध पदाधिकारी करत आहेत. तर ही जागा भाजपला मिळणार, असा दावा कलानी समर्थक आणि भाजप इच्छुक करत आहेत. रिपाइंनेही या जागेवर दावा सांगितला आहे. त्यामुळे या जागेचा संभ्रम कायम आहे. भाजपचे कुमार आयलानी आणि ओमी कलानी या दोघांनी याबाबत भाष्य करणे टाळले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नवी मुंबईकरांचा प्लास्टिकमुक्तीचा जागर

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, नवी मुंबई

महात्मा गांधी यांची १५०वी जयंती तसेच स्वच्छ भारत मिशन अंतर्गत राबविल्या जात असलेल्या 'स्वच्छता ही सेवा' मोहिमेमध्ये प्रामुख्याने प्लास्टिक प्रतिबंध ही संकल्पना राबविण्यात येत आहे. त्यानुसार महापालिकेच्या आठही विभागांच्या कार्यक्षेत्रात राबविण्यात आलेल्या विविध उपक्रमांमध्ये महापालिकेच्या तसेच खासगी शाळा आणि कॉलेजचे विद्यार्थी, सोसायट्या-वसाहती यामधील नागरिक, महिला बचत गट, ज्येष्ठ नागरिक त्यासोबतच दिव्यांग मुले, व्यक्ती यांनी सहभागी होत प्लास्टिकमुक्तीसह स्वच्छतेचा मोठा प्रमाणावर जागर केला.

महापालिका क्षेत्रातील खासगी व महापालिकेच्या सर्व शाळा तसेच कॉलेजांतील दोन लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी महात्मा गांधी जयंतीचे औचित्य साधून १ व २ ऑक्टोबरला प्रार्थनेच्या वेळी प्लास्टिकमुक्त नवी मुंबईची सामूहिक शपथ घेतली. स्वच्छता व प्लास्टिक प्रतिबंधात्मक जनजागृतीपर रॅली महानगरपालिका क्षेत्रातील १००हून अधिक शाळांनी आपापल्या विभागात काढल्या. काही शाळा, कॉलेजांनी पथनाट्याद्वारे जनजागृती केली. बेलापूर ते दिघा अशा आठही विभाग कार्यालय क्षेत्रात १००हून अधिक ठिकाणी महापालिका अधिकारी, कर्मचारी यांच्यासह त्या त्या ठिकाणचे सोसायट्या-वसाहतींचे पदाधिकारी व विविध वयोगटांतील स्वच्छताप्रेमी नागरिक, स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी, विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभागी होत परिसर स्वच्छतेवर भर दिला. ठिकठिकाणी शपथ घेऊनच मोहिमेला सुरुवात करण्यात आली. या मोहिमांमध्ये पाच हजार किलो प्लास्टिक कचरा जमा करण्यात आला.

वाशी येथे 'रन फॉर इंडिया' या संस्थेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या मॅरेथॉनमध्ये पाच हजारांहून अधिक नागरिकांनी 'एक धाव प्लास्टिकमुक्त नवी मुंबईसाठी' म्हणत प्लास्टिकमुक्तीची सामूहिक शपथ घेतली. घणसोली विभागात विद्यार्थी आणि नागरिक यांनी एकत्रितपणे स्थानक परिसर व इतर चार ठिकाणी मानवी साखळी करून प्लास्टिक प्रतिबंधासाठी आम्ही सगळे मिळून कटिबद्ध आहोत, असा संदेश दिला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मुक्तबंदी योजना कागदावरच

$
0
0

पाच वर्षात यंदा फुटला नारळ; अनेकांना माहितीच नाही

म. टा. वृत्तसेवा, ठाणे

एखाद्या गुन्ह्यात शिक्षा भोगल्यानंतर पुन्हा त्या व्यक्तीला समाजात नव्याने आयुष्याची सुरुवात करता यावी, यासाठी राज्य सरकारने काही वर्षांपूर्वी मुक्तबंदी योजना आणली. गेल्या पाच वर्षांचा आढावा घेतल्यास प्रत्यक्षात मात्र गेल्या वर्षी या योजनेला सुरुवात झाल्याचे दिसून आले. लाभार्थीच नसल्यामुळे मुक्तबंदी योजना गेली चार वर्षे केवळ कागदावर होती. यावर्षी एका लाभार्थीला लाभ देण्यात आला असून अद्याप योजना अनेकांपर्यंत पोहोचलीच नसल्याचे अधोरेखित होत आहे.

शिक्षा भोगल्यानंतर समाजात कैदी अथवा बंदी ही ओळख पुसण्यासाठी आणि कुटुंबीयांबरोबर नव्याने आयुष्य सुरू करण्यासाठी त्याला नवा रोजगार उपलब्ध होणे आवश्यक आहे. कैदी ही ओळख पाठीशी असल्यास त्याला बँक अथवा समाजातील कोणतीच व्यक्ती मदतीसाठी पुढे येत नाही. त्यामुळे त्याच्या उदरनिर्वाहासाठी सरकारने १६ मे १९५८मध्ये मुक्तबंदी योजना आणली. महिला व बाल विकास योजनेअंतर्गत सुरू करण्यात आलेल्या योजनेत गेल्या ६१ वर्षांत फार कोणते बदल करण्यात आलेले नाहीत. त्यामुळे ही योजना लोकांपर्यंत पोहोचली नाही. ठाण्यात २०१५पासून या योजनेतील लाभार्थी पाहिल्यास २०१९मध्ये केवळ एका लाभार्थीने याचा लाभ घेतला असल्याची माहिती पुढे आली आहे. कारागृहात शिक्षा भोगत असताना घेतलेल्या प्रशिक्षणाचा उपयोग करत स्वत:चा व्यवसाय सुरू करण्यासाठी त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी ही योजना आणली असली तरी ती लाभार्थींअभावी कागदावरच आहे.

…………………पाच हजारांवरून २५ हजार

या योजनेच्या माध्यमातून मुक्तबंदीला नव्याने व्यवसाय सुरू करण्यासाठी पूर्वी पाच हजार रुपयांचे अर्थसाह्य केले जात होते, मात्र गेल्या दोन वर्षांपासून या रकमेमध्ये वाढ करत ती २५ हजारांपर्यंत करण्यात आली आहे. गेल्या चार वर्षांत याला प्रतिसाद मिळाला नसल्याचे दिसून येते. यावर्षी फक्त एका लाभार्थीला या योजनेतून लाभ देण्यात आला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बेलापूर मतदारसंघातील मतदारांमध्ये वाढ

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, नवी मुंबई

लोकसभेच्या निवडणुकीनंतर बेलापूर मतदारसंघात आतापर्यंत मतदार नोंदणीसंख्येत वाढ झाली आहे. त्यामुळे मतदारनोंदणी करण्याबाबत नागरिकांमध्ये जनजागृती वाढत असल्याचे स्पष्ट होत आहे. लोकसभा निवडणुकीच्या वेळी बेलापूर विधानसभेतील मतदारांची संख्या ही तीन लाख ७६ हजार १९ इतकी होती. तर, आता विधानसभेच्या निवडणुकांदरम्यान ही संख्या वाढून तीन लाख ८१ हजार ९०२ इतकी झाली आहे म्हणजे पाच हजार ८८३ नवमतदार वाढले आहेत, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी ज्ञानेश्वर कुठवडकर यांनी दिली आहे.

एकूण मतदारांपैकी २ लाख ६ हजार ४६ पुरुष मतदार आहेत तर १ लाख ७५ हजार ८५२ स्त्री मतदार आहेत. तर, तृतीय पंथी मतदारांची संख्या चार आहे. सैनिक मतदार ११० आहेत. बेलापूर विधानसभा मतदारसंघात मूळ ३८६ इतके मतदान केंद्र उभारण्यात आले आहे. तर, चार सहाय्यक केंद्रे आहेत. एकूण मतदान केंद्रांची संख्या ३९० इतकी आहे. ३७ मतदान केंद्रे ही पहिल्या आणि दुसऱ्या मजल्यावर असल्याने तिथे जाण्यासाठी लिफ्टची व्यवस्था असणार आहे. या मतदान केंद्रांवर एकूण दोन हजार २१२ अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे. या कर्मचाऱ्यांसाठी निवडणुकीबाबतची माहिती देणारे पहिले प्रशिक्षण पार पडले असून दुसरे प्रशिक्षण ११ तारखेला आगरी कोळी भवन येथे होणार आहे. याच ठिकाणी या कर्मचाऱ्यांना निवडणूक साहित्य वाटप केले जाणार असून येथेच मतमोजणीही होईल.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


फळांची आवक कमी; मागणीत मात्र वाढ

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, नवी मुंबई

नवरात्र उत्सव सुरू झाल्यामुळे अनेकांचे नऊ दिवसांचे उपवासही सुरू झाले आहेत. या उपवासादरम्यान फलाहार करण्याकडे अनेकांचा कल असतो. त्यामुळे बाजारात फळांना मोठी मागणी असते. या काळात बाजारात चांगली उलाढाल ही होते. यावेळीही बाजारात फळांना मोठी मागणी आहे, मात्र ही मागणी पूर्ण करता येईल इतकी फळे बाजारात येत नसल्याने फळांचे दर दुप्पट-तिप्पट झाले आहेत.

पावसामुळे फळांच्या बागांवर झालेल्या परिणामामुळे बाजारात फळांची आवक निम्म्यावर आली आहे. उत्पादनच नसल्याने बाजारात फळे पाठवणे शेतकऱ्यांना सहज शक्य होत नाही. त्यामुळे दरवर्षीच्या मानाने यावर्षी फळांची आवक निम्म्याहूनही कमी झाली असल्याचे व्यापारी सांगत आहेत. ऑक्टोबर महिन्यात पपई, खरबूज, कलिंगड, डाळिंब, सीताफळ या फळांची चांगली आवक होत असते. त्यामुळे मागणीइतका पुरवठा करणे व्यापाऱ्यांना सहज शक्यही होते. मात्र यावेळी मागणीइतका पुरवठा बाजारात नसल्याने ही मागणी पुरवणे व्यापाऱ्यांना शक्य होत नसल्याचे व्यापारी सांगत आहेत.

नेहमीच्या मानाने आता फळांची आवक दुपटीने तिपटीने कमी झाली आहे. बाजारात मालच नसल्याने बाजार सुनासुना वाटत आहे. यामुळे फळांचे दरही घाऊक बाजारात वाढलेले पाहायला मिळत आहेत. डाळिंब ८० ते १५० रु किलोच्या घरात आहेत. सीताफळ ७० ते १२० रु. किलो, पपई २० ते ३५ रु. किलो आहेत आणि कलिंगडही १० ते १५ रु. किलो आहेत. खरबूज २० ते ३५ रु. किलो आहेत, अशी माहिती फळांचे घाऊक व्यापारी शिवाजीराव चव्हाण यांनी दिली आहे. त्यामुळे किरकोळ बाजारात हे दर अधिकच वाढल्याची परिस्थिती आहे. मात्र उपवास असल्याने लोक ही फळे खरेदी करण्यासाठी बाजारात जात आहेत, मात्र बाजारात पुरेशा प्रमाणात फळे मिळत नसल्याची परिस्थिती आहे. या काळात दरवर्षी जागोजागी फळविक्रेते बसलेले पाहायला मिळत असत, यावेळी मात्र फळविक्रेत्यांकडेही फळांची टंचाई आहे.

सफरचंदाची चलती

बाजारात अन्य फळे नसली तरी आता बाजारात भारतीय सफरचंदाची चांगली आवक होत आहे. त्यामुळे बाजारात केवळ सफरचंद अधिक प्रमाणात असल्याचे पाहायला मिळत आहे. आता सिमल्यावरून येणाऱ्या सफरचंदाचा हंगाम संपला असून काश्मीर आणि किन्नोरमधून सफरचंदाची चांगली आवक होत आहे. त्यामुळे बाजारात केवळ सफरचंद मोठ्या प्रमाणात पाहायला मिळत आहेत. सफरचंद घाऊक बाजारात ५० ते ८० रुपये किलोपर्यंत विकली जात आहेत. त्यामुळे किरकोळ बाजारात ही सफरचंद ८० ते १०० रु. किलोच्या घरात सहजपणे मिळत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आज होणार शक्तिप्रदर्शन

$
0
0

उमेदवारी अर्ज दाखल होण्यासाठी उरले दोनच दिवस

म. टा. वृत्तसेवा, नवी मुंबई

उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी आता ३ आणि ४ ऑक्टोबर हे दोनच दिवस शिल्लक राहिले असल्याने या दोन्ही दिवशी उमेदवार अर्ज भरण्यासाठी निवडणूक कार्यालयात दाखल होणार आहेत. बेलापूर मतदारसंघातून भाजपच्या वतीने विद्यमान आमदार मंदा म्हात्रे तर राष्ट्रवादीतून अशोक गावडे, मनसेच्या वतीने गजानन काळे उमेदवारी अर्ज भरणार आहेत. तर, ऐरोली मतदारसंघातून भाजपच्या वतीने उमेदवार म्हणून गणेश नाईक यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले असल्याने तेही गुरुवारीच उमेदवारी अर्ज भरण्याची शक्यता आहे. या वेळी दोन्ही मतदारसंघांतून उमेदवार शक्तिप्रदर्शन करणार, हे नक्की आहे. ऐरोली मतदारसंघात अन्य पक्षांच्या वतीने अजून उमेदवार स्पष्ट न झाल्याने येथे गणेश नाईक यांना टक्कर द्यायला कोण उभे राहणार, हे शुक्रवारीच स्पष्ट होईल.

बेलापूर विधानसभा मतदारसंघातून आतापर्यंत ३४ जणांनी ६१ अर्ज नेले आहेत. तर, ऐरोली मतदारसंघातून ३३ जणांनी ५९ अर्ज निवडणूक कार्यालयातून नेले आहेत. यापैकी बेलापूर मतदारसंघात युवा जनकल्याण पक्षाच्या अजयकुमार उपाध्यक्ष यांनी आणि अपक्ष म्हणून संतोष कांबळे यांनी उमेदवारी अर्ज सादर केला आहे. मात्र ऐरोली मतदारसंघात अजून कोणत्याही उमेदवाराने अर्ज सादर केलेला नाही. ४ ऑक्टोबर हा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी शेवटचा दिवस असल्याने दोन दिवसांत अर्ज भरण्याची लगबग उमेदवारांना करावी लागणार आहे. त्यानुसार आज, गुरुवारी मंदा म्हात्रे, अशोक गावडे आणि गजानन काळे उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. या मतदारसंघात शिवसेनेच्या वतीने बंडखोरी करून अपक्ष उमेदवार उभा राहण्याचीही शक्यता आहे. त्यामुळे या मतदारसंघाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. ऐरोली मतदारसंघात संदीप नाईक यांनी त्यांची जागा वडिलांना देऊ केल्याने आता संदीप नाईक यांच्या जागी गणेश नाईक या मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहेत. मात्र राष्ट्रवादी काँग्रेसकडून आणि मनसेकडून निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या उमेदवारांची नावे उमेदवारी अर्ज भरतानाच स्पष्ट होणार आहेत. त्यामुळे सध्या तरी या मतदारसंघात एकेरी लढत होण्याचे चित्र असून ४ तारखेला सगळ्या शंकाकुशकांना विराम मिळणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बिल्डरकडे मागितली खंडणी

$
0
0

ठाणे : माहिती अधिकार कायद्याचा वापर खंडणी उकळण्यासाठी होत असल्याचा प्रकार पुन्हा एकदा ठाण्यात समोर आला. झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणामार्फत राबवण्यात येणाऱ्या पुनर्वसन प्रकल्पाच्या विरोधात माहिती अधिकार कायद्याअंतर्गत अर्ज करून बिल्डरकडे पाच लाखांची खंडणी मागणारा आरटीआय कार्यकर्ता मिलिंद कुवळेकर याच्याविरुद्ध कोपरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपीने फ्लॅट आणि दरमहा नऊ हजारांची मागणी बिल्डरकडे केली होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

युतीचा धर्म नरेंद्र पाटील यांना अमान्य

$
0
0

अपक्ष म्हणून रिंगणात उतरणार, शिवसेनेची भोईर यांना उमेदवारी

म. टा. वृत्तसेवा, कल्याण

युतीच्या जगावाटपात सर्वात जास्त चढाओढ रंगलेल्या कल्याण पश्चिम मतदारसंघातून अखेर शिवसेनेने विद्यमान शहरप्रमुख विश्वनाथ भोईर यांना उमेदवारी जाहीर करत दोन दिवसांपासून रंगलेल्या नाट्यवर पडदा टाकला. मात्र भाजपचे आमदार नरेंद्र पवार यांनी कार्यकर्त्यांच्या विनंतीनुसार या मतदारसंघातून अपक्ष निवडणूक लढविणार असल्याची घोषणा केल्याने या मतदारसंघातील लढतीकडे लक्ष असेल.

कल्याण पश्चिम मतदारसंघातून भाजपचे विद्यमान आमदार नरेंद्र पवार याना तिकीट दिले जाणार असल्याची कुणकुण लागताच शिवसेना पदाधिकारी कार्यकर्त्यांनी गोंधळ घालत भाजपविरोधात बंडखोरी करण्याचा इशारा दिला होता. तसेच या मतदारसंघावर आपला दावा असल्याचे सांगत संघर्ष केला. अखेर कार्यकर्ते नि पदाधिकाऱ्यांच्या संतापाची दखल घेत युतीच्या चर्चेत हा मतदारसंघ शिवसेनेला सोडण्यात आल्यामुळे निवडणूक लढविण्याच्या तयारीला लागलेल्या भाजप कार्यकर्त्यांमध्ये संतापाची लाट आहे. मंगळवारी भाजपच्या कार्यकर्त्यांनी संकल्प मेळावा घेत आमदार पवार यांना अपक्ष म्हणून निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याचे आवाहन केले. अखेर कार्यकर्त्यांच्या भावना लक्षात पवार यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढविणार असल्याचे सांगत चार तारखेला उमेदवारी अर्ज भरणार असल्याचे स्पष्ट केले. आपल्याकडून हक्काची जागा हिरावून घेत उपऱ्या उमेदवाराला देण्यात आल्याबद्दल पवार यांनी नाराजी व्यक्त केली. यानंतर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस, कोकण संघटक सतीश धोंड यांच्यासह राज्यमंत्री रविंद्र चव्हाण यांनी पवार यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. मात्र आता कोणत्याही परिस्थितीत माघार घेणार नसल्याचा निर्धार पवार यांनी व्यक्त केला.

सज्जड दम

शिवसेनेत मंगळवारपासून रंगलेल्या उमेदवारी नाट्यावर बुधवारी दुपारनंतर पडदा पडला. शिवसेनेकडून ठाणे ग्रामीण जिल्हाध्यक्ष प्रकाश पाटील यांना उमेदवारी देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र कल्याण पश्चिमेतून तब्बल १० जण इच्छुक असतानाही उपरा उमेदवार का, असा सवाल करत शिवसैनिकांनी वरिष्ठांची मनधरणी करण्याचा प्रयत्न केला. यानंतर दुपारपर्यंत थेट मातोश्रीवरून कल्याण पश्चिमेसाठी उमेदवार दिला जाणार असल्याच्या चर्चांना उधाण आले होते. मात्र अखेर पक्षाकडून भोईर यांना अधिकृत उमेदवारी जाहीर करत या नाट्यावर पडदा पाडला. यानंतर शिवसैनिकांनी मातोश्रीबाहेरच विजयी जल्लोष केला. मात्र हट्टाने मागून घेतलेली ही जागा कोणत्याही परिस्थितीत निवडून आणावी लागेल, असा सज्जड इशारा वजा दम वरिष्ठांकडून कल्याणच्या शिवसैनिकांना देण्यात आल्याने नाराज भाजप कार्यकर्त्यांना चुचकरण्याबरोबरच बंडखोरी थंड करण्याचे आव्हान त्यांच्यासमोर आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बंडाळीची उसळी

$
0
0

म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई

विधानसभा निवडणुकीसाठी राजकीय पक्षांकडून उमेदवारांच्या याद्या जाहीर होताच उमेदवारी न मिळालेल्यांनी बंडाच्या तलवारी उपसणे सुरू केले आहे. सर्वात जास्त अंसतोष भारतीय जनता पक्षात उफाळून आला असून, दुसऱ्याही यादीत नाव नसल्यास अपक्ष लढण्याचा पवित्रा पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि माजी महसूल मंत्री एकनाथ खडसे यांनी घेतल्याचे सांगण्यात येते. दुसरीकडे, मराठवाड्यातील औसा मतदारसंघात भाजपने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे स्वीय सचिव अभिमन्यू पवार यांना उमेदवारी दिल्यानेही अनेक जण नाराज आहेत. कोल्हापूर जिल्ह्याच्या मतदारसंघांतील इच्छुकांना उमेदवारी देण्यात भाजपला अपयश आले असल्याने या जिल्ह्यातही पक्षात मोठी बंडखोरी होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. मुख्यमंत्र्यांचा बालेकिल्ला असलेल्या नागपुरातही भाजपमधील असंतोष उफाळून आला आहे.

खडसे बंडाच्या तयारीत?

एकनाथ खडसे यांच्या उमेदवारीसाठी लेवा पाटीदार समाज आक्रमक. दुसऱ्या यादीत नाव नसल्यास खडसे बंडाच्या तयारीत असल्याचे संकेत आहेत.

कोल्हापुरातही बंड?

कोल्हापुरातील इच्छुकांना उमेदवारी देण्यात भाजपला अपयश आल्याने या जिल्ह्यातही भाजपमध्ये मोठ्या बंडखोरीची शक्यता आहे.

नाशकात शिवसेना नाराज

'नाशिक पश्चिम' भाजपला दिल्याने या विभागातील शिवसेनेच्या २२ नगरसेवकांनी राजीनामे देण्याची धमकी दिली आहे.

पित्यासाठी संदीप नाईक यांची माघार

गणेश नाईक यांना भाजपने बेलापूरमधून उमेदवारी नाकारल्यानंतर ऐरोलीतून संदीप नाईक यांनी पित्यासाठी बुधवारी माघार घेतली. त्यामुळे गणेश नाईक ऐरोलीतून निवडणूक लढवण्यास सज्ज झाले आहेत. बेलापूरमधून मंदा म्हात्रे भाजपकडून निवडणूक लढवणार आहेत. यामुळे शिवसैनिक नाराज असून बंडखोरी होण्याची शक्यता आहे.

कल्याण पश्चिममध्ये नरेंद्र पवारांचे बंड

कल्याण पश्चिम मतदारसंघ शिवसेनेला दिल्याने भाजपच्या कार्यकर्त्यांनी विद्यमान आमदार नरेंद्र पवार यांना अपक्ष लढण्यासाठी आग्रह धरला आहे. पवार यांनी तशी तयारी केली असून आज, शुक्रवारी ते अर्ज दाखल करणार आहेत. दरम्यान, कल्याणमध्ये शिवसेनेने आधी प्रकाश पाटील, त्यानंतर वरुण सरदेसाई यांना उमेदवारी दिल्याची चर्चा होती. परंतु, अखेर स्थानिक इच्छुक उमेदवार विश्वनाथ भोईर यांच्या नावावर पक्षनेतृत्वाने शिक्कामोर्तब केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘कामगारांसाठी कायदेशीर मार्गाने लढू’

$
0
0

अॅड. विजय कुर्ले यांचा आशावाद

म. टा. वृत्तसेवा, पनवेल

सिडकोकडून पनवेल महापालिकेकडे आरोग्य विभागाचे हस्तांतरण करून १ ऑक्टोबर रोजी एक वर्ष पूर्ण झाले, मात्र अद्यापही सफाई कामगारांना कायदेशीर सोयीसुविधा दिल्या जात नाहीत. आझाद कामगार संघटनेच्या माध्यमातून कामगारांसाठी कायदेशीर मार्गाने लढा देऊ, असे आश्वासन अॅड. विजय कुर्ले यांनी मंगळवारी खांदा कॉलनी येथे केले. आझाद कामगार संघटनेने आयोजित केलेल्या कामगार मेळाव्यात ते बोलत होते.

पनवेल महापालिकेच्या सफाई कामगार, घंटागाडी कामगार यांसह इतर अनेक विभागांमध्ये काम करणाऱ्या कंत्राटी कामगारांना कामगार कायद्यानुसार सोयीसुविधा दिल्या जात नाहीत. आझाद कामगार संघटनेच्या माध्यमातून उपोषण केल्यानंतर कामगार आयुक्तांच्या मध्यस्थीने कामगारांच्या मागण्या मान्य करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र त्यानंतर महापालिका प्रशासनाला याचा विसर पडला. कामगारांना कायद्याचे ज्ञान असावे, हक्क माहिती असावेत यासाठी या सगळ्या पार्श्वभूमीवर मुंबई उच्च न्यायालयातील वकील विजय कुर्ले यांच्या मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन केले होते. खांदा कॉलनीतील जनसेवा सभागृहात झालेल्या कार्यक्रमाला महापालिकेचे कंत्राटी कर्मचारी मोठ्या संख्येने हजर होते. कामगारांना इएसआयसी कार्ड, ओळखपत्रे, पगारातून कापण्यात आलेली बोनस रक्कम, कामगारांना गणवेश, गमबूट मिळावे, एक वर्षाला २१ पगारी रजा मिळाव्यात या मागण्यांसाठी आझाद कामगार संघटनेच्या माध्यमातून कामगार नेते महादेव वाघमारे लढा देत आहेत. या लढा कायदेशीर मार्गाने लढू आणि विजयी करू, असा विश्वास कुर्ले यांनी भाषणात व्यक्त केला. पनवेल महानगरपालिका स्वच्छता अभियान सफाई कामगार, घंटागाडी कामगारांच्या जीवावर करतात, त्या कामगारांना मूलभूत सोयीसुविधांपासून दूर ठेवले जाते, ही खेदजनक बाब आहे, असे मत त्यांनी व्यक्त केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संघटनेचे पदाधिकारी सुभाष बसवेकर होते. विशेष म्हणजे पनवेल महापालिकेच्या माध्यमातून कंत्राटी कामगारांना एकत्र करण्यासाठी आझाद कामगार संघटना प्रयत्नशील आहे. महापालिकेचा दबाव झुगारून शेकडोंच्या संख्येने कामगार सहभागी झाले होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

म टा

$
0
0

म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई

विधानसभा निवडणुकीसाठी राजकीय पक्षांकडून उमेदवारांच्या याद्या जाहीर होताच उमेदवारी न मिळालेल्यांनी बंडाच्या तलवारी उपसणे सुरू केले आहे. सर्वात जास्त अंसतोष भारतीय जनता पक्षात उफाळून आला असून, दुसऱ्याही यादीत नाव नसल्यास अपक्ष लढण्याचा पवित्रा पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि माजी महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी घेतल्याचे सांगण्यात येते. दुसरीकडे मराठवाड्यातील औसा मतदारसंघात भाजपने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे स्वीय सचिव अभिमन्यू पवार यांना उमेदवारी दिल्यानेही अनेक जण नाराज आहेत. कोल्हापूर जिल्ह्याच्या मतदारसंघांतील इच्छुकांना उमेदवारी देण्यात भाजपला अपयश आले असल्याने या जिल्ह्यातही पक्षात मोठी बंडखोरी होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. मुख्यमंत्र्यांचा बालेकिल्ला असलेल्या नागपुरातही भाजपमधील असंतोष उफाळून आला आहे. नाशिकमध्ये आमदार बाळासाहेब सानप यांचे यादीत नाव न आल्याने समर्थकांनी जोरदार घोषणाबाजी केली आहे.

सविस्तर बातम्या...६

खडसे बंडाच्या तयारीत?

एकनाथ खडसे यांच्या उमेदवारीसाठी लेवा पाटीदार समाज आक्रमक. दुसऱ्या यादीत नाव नसल्यास खडसे बंडाच्या तयारीत असल्याचे संकेत.

औसामध्ये नाराजी

मराठवाड्यातील औसा मतदारसंघात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे स्वीय सचिव अभिमन्यू पवार यांना उमेदवारी जाहीर केल्यानंतर नाराजी.

कोल्हापुरातही बंड?

कोल्हापुरातील इच्छुकांना उमेदवारी देण्यात भाजपला अपयश आल्याने या जिल्ह्यातही भाजपमध्ये मोठ्या बंडखोरीची शक्यता.

नाशकात शिवसेना नाराज

'नाशिक पश्चिम' भाजपला दिल्याने या विभागातील शिवसेनेच्या २२ नगरसेवकांनी राजीनामे देण्याची धमकी दिली आहे.

....

पित्यासाठी संदीप नाईक यांची माघार

गणेश नाईक यांना भाजपने बेलापूरमधून उमेदवारी नाकारल्यानंतर ऐरोलीतून संदीप नाईक यांनी पित्यासाठी बुधवारी माघार घेतली. त्यामुळे गणेश नाईक ऐरोलीतून निवडणूक लढवण्यास सज्ज झाले आहेत. बेलापूरमधून मंदा म्हात्रे भाजपकडून निवडणूक लढवणार आहेत. यामुळे शिवसैनिक नाराज असून बंडखोरी होण्याची शक्यता आहे.

कल्याण पश्चिममध्ये नरेंद्र पवारांचे बंड

कल्याण पश्चिम मतदारसंघ शिवसेनेला दिल्याने भाजपच्या कार्यकर्त्यांनी विद्यमान आमदार नरेंद्र पवार यांना अपक्ष लढण्यासाठी आग्रह धरला आहे. पवार यांनी तशी तयारी केली असून आज, शुक्रवारी ते अर्ज दाखल करणार आहेत. दरम्यान, कल्याणमध्ये शिवसेनेने आधी प्रकाश पाटील, त्यानंतर वरुण सरदेसाई यांना उमेदवारी दिल्याची चर्चा होती. परंतु, अखेर स्थानिक इच्छुक उमेदवार विश्वनाथ भोईर यांच्या नावावर पक्षनेतृत्वाने शिक्कामोर्तब केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


राज्यमंत्री भेगडेंनाही बंडखोरीचा झटका

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, लोणावळा

शिस्तबद्ध भारतीय जनता पक्षाला मावळातही बंडखोरीची लागण झाली असून उमेदवार राज्यमंत्री बाळा भेगडे यांच्यासह आणखी दोघे भाजप कार्यकर्तेही अर्ज भरणार आहेत. सुनील शेळके आणि रवींद्र भेगडे यांनीही अर्ज भरण्याचा पवित्रा घेतल्याने राज्यमंत्र्यांपुढे आव्हान निर्माण झाले आहे.

भाजपकडून राज्यमंत्री भेगडे यांना थेट एबी फॉर्म देण्यात आला आहे. आज (गुरुवारी) ते अर्ज भरणार आहेत. दुसरे इच्छुक सुनील शेळके अपक्ष अर्ज दाखल करणार आहेत. शेळके हे 'राष्ट्रवादी'च्या संपर्कात असून एबी फॉर्म मिळाल्यास ते राष्ट्रवादीचे उमेदवार म्हणून अर्ज दाखल करणार असल्याची सर्वत्र चर्चा आहे. यामुळे 'राष्ट्रवादी'चे दुसरे इच्छुक बाळासाहेब नेवाळे नाराज झाले असून, बंडखोरीच्या पवित्र्यात आहेत. आजची निवडणूक ग्रामीण भागाच्या अस्मितेची लढाई आहे. पक्षाने निष्ठावंताना उमेदवारी डावलून आयारामांना दिल्यास त्याची मोठी किंमत पक्षाला मोजावी लागेल, असे सुनावून नेवाळे यांनी बंडखोरीचा झेंडा उभारला आहे. उमेदवारीबाबत बापूसाहेब भेगडे हे काय निर्णय घेतात, हेही गुलदस्तात आहे.

राज्यमंत्री भेगडे यांनी दहा वर्षे मतदारसंघाचे नेतृत्व केले असून यंदा हॅटट्रिकची तयारी सुरू केली आहे. मात्र, तळेगावचे माजी उपनगराध्यक्ष सुनील शेळके व मावळ भाजपा युवा मोर्चाचे माजी अध्यक्ष रवींद्र भेगडे यांना मागील चार वर्षांपासून विधानसभेचे वेध लागल्याने त्यांनी भेगडे यांच्यापुढे आव्हान निर्माण केले आहे. नुकत्याच झालेल्या गावभेटी प्रचार दौऱ्यादरम्यान तिन्ही इच्छुकांनी 'कमळ हाच आमचा उमेदवार' असे सांगून भाजपची शिस्तप्रियता व संघटनेला प्राध्यान्य दिले होते. वडगाव येथे नुकत्याच झालेल्या बूथ कमिटीच्या विजयी मेळाव्यादरम्यान केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांच्यासमवेत तिन्ही इच्छुकांनी एकाच गाडीतून सभास्थळी येऊन 'आमचं ठरलंय,' असे सांगत एकीचे दर्शन घडविले होते. मात्र, सध्याची तालुक्यातील राजकीय परिस्थिती वेगळी आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कल्याणमध्ये रेल्वे रुळालगत सापडले ३६ लाखांचे मोबाइल

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, कल्याण
कल्याण वालधुनीदरम्यान असलेल्या रेल्वे रुळावरील गस्तीदरम्यान महाराष्ट्र सुरक्षा दलाच्या जवानांनी नोकिया कंपनीचे १९४ नवे कोरे सुमारे ३६ लाख रुपये किमतीचे मोबाइल जप्त केले. हे सर्व मोबाइल नारपोली पोलिस ठाण्याच्या हद्दीतील नोकिया कंपनीच्या गोदामातून चोरी केलेले मोबाइल असल्याचे चौकशीत उघड झाले.

रेल्वे प्रवाशांच्या हातावर फटका मारून त्यांच्या हातातील किमती सामान चोरणाऱ्या चोरट्याविरोधात रेल्वे पोलिसांनी पोलिस आयुक्त रवींद्र शेनगावकर यांच्या नेतृत्वाखाली ठिकाणे निश्चित केली आहेत. कल्याण वालधुनी दरम्यान असलेल्या ठिकाणावर गस्ती घालत असताना महाराष्ट्र सुरक्षा दलाच्या जवानांना कल्याणकडून वालधुनीच्या दिशेने रुळांमधून चार अज्ञात तरुण चालत येत असताना दिसले. या तरुणांवर संशय आल्याने जवानांनी त्यांना हटकताच त्यांनी पकडले जाण्याच्या भीतीने हातातील बॅग टाकून पळ काढला. या बॅगेत नोकिया कंपनीचे १८ हजार रुपये किमतीचे १९४ मोबाइल सापडले. तपासादरम्यान हे सर्व मोबाइल भिवंडीमधील गोदामातून चोरल्याचे निष्पन्न झाले. रेल्वे पोलिस या चोरट्याचा सीसीटीव्हीच्या मदतीने शोध घेत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ठाण्यात अवतरलेय देखणे ‘बंगाल’

$
0
0

ठाणे :

कल्पनाशक्ती पणाला लावत झाडुपासून बनविलेले झुंबर, बेलफळ, कवड्या यांनी साकारलेल्या खांबावर लावलेले नयनरम्य मधुबनी चित्र, डोळे दिपविणाऱ्या रोषणाईत वसलेली दुर्गेची मूर्ती…... ठाण्यातील ढोकाळी परिसरात अवतरलेल्या देखण्या बंगालची सफर ठाणेकरांना करता येणार आहे. दुर्गापूजेचे औचित्य साधून बांगीय परिषदेने पहिल्यांदाच थीम पूजेचा बेत आखला आहे. नव्या पिढीला दुर्गापूजेचे पारंपरिक रूप दाखविण्यासाठी थेट बंगालमधून आलेल्या कलाकारांनी येथे ग्रामीण संस्कृतीचे प्रतिरूप उभारले आहे.

जन्म, शिक्षण, हजारो कौटुंबिक क्षण या सगळ्यांकडे पाठ फिरवित उच्चशिक्षणासह नोकरीसाठी शेकडो पाय रोज मुंबईकडे वळतात. अनेक वर्षांपासून मुंबईकडे येणारे नोकरदार ठाणे, मुंबईसारख्या शहरांमध्ये स्थिरावत असले तरी मायानगरीच्या गर्दीत मनातील गाव जपणाऱ्यांनी आपापल्या उत्सवांचा पाया शहरातही रचला असतानाच ठाण्यातील बांगीय परिषदेतर्फे यंदाही दुर्गापूजेचे आयोजन करण्यात आले आहे. यंदाच्या पूजेचे हे ५७वे वर्ष असले तरी संकल्पनेवर आधारित पूजा हा नवा प्रयोग परिषदेने केला आहे. नोकरीनिमित्त शहरात स्थिरावलो असलो, तरी मुलांना गावाची ओळख नाही. दुर्गापूजेसारखा सोहळा केवळ धार्मिक नसून संस्कृतीचे दर्शन घडविणारा आहे, मात्र स्थलांतरित पालकांमुळे नव्या पिढीपर्यंत हा ठेवा पोहोचत नसल्याच्या भावनेतून बांगीय परिषदेतर्फे दुर्गापूजेचे आयोजन केले जात असल्याचे कौशिक घोष यांनी सांगितले.

संस्कृतीचा हा ठेवा इतर धर्मीयांपर्यंत पोहोचविण्यासाठी यंदा संकल्पनेवर आधारित उत्सव साजरा केला जात आहे. यासाठी बंगालमधील संस्कृतीची प्रतिकृती ढोकाळी येथील मैदानात उभारण्यात आली आहे. बंगालमधील मिदानपूर गावातील लोककलाकारांना त्यासाठी ठाण्यात पाचारण करण्यात आले असून तब्बल ६० कलाकारांनी हा देखावा साकारला आहे. पारंपरिक पद्धतीचे घर (कुटी), प्रशस्त अंगणातील तुळशीचे वृंदावन, जागोजागी दिसणारी लोककलेची प्रतिके हे येणाऱ्या भक्तांचे स्वागत करतात. सभोवतालची हिरवळ खोटी नसून पारंपरिक पद्धतीने प्रत्यक्ष गव्हाच्या दाण्यांमधून बहरलेली आहे. डोळे दिपवून टाकणाऱ्या रोषणाईतच या भव्य देखाव्यात प्रवेश केल्यानंतर तेथील प्रत्येक वस्तू स्वतःचे वैशिष्ट्य सांगते. झाडूचा वापर करत तयार केलेली भित्तीचित्रे, बेलफळाचे तोरण, शंख, कापूर, कवड्यांसह बांबूपासून उभारलेल्या वैविध्यपूर्ण वस्तू... मंडपात वारलेली प्रत्येक वस्तू ही टाकाऊ घटकांपासून तयार करण्यात आल्या आहेत. पर्यावरणपूरक उत्सवाचा केवळ संदेश देण्यापेक्षा प्रत्येक वस्तू त्याच आशयातून साकारण्याची किमया कलाकारांनी घडविली. एककीडे आदिवासी बंगाली संस्कृतीची सफर घडविणाऱ्या प्रतिकृती तर दुसरीकडे मा दुर्गेची देखणी मूर्ती, असा सुरेल मेळ साधण्यात आला आहे.

इये मनोरंजनाची नगरी
पाच दिवसांच्या या उत्सवात दुर्गेच्या दर्शनासह बंगाली संस्कृतीचा खजिना खुला होणार आहे. बच्चेकंपनीसह महिलांचे सांस्कृतिक कलाविष्कार, आनंदमेळा या संकल्पनेच्या निमित्ताने चाखता येणारे घरगुती पारंपरिक पदार्थ, सिंदुरखेला, दुर्गापूजा, धुनोचिन्ना यांसारख्या अनेकविध कलाविष्कारातून पाचही दिवस संस्कृतीचा जागर येथे रंगणार असल्याचे परिषदेतर्फे सांगण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ठाणे जिल्ह्यात ६४ उमेदवारांकडून ८२ अर्ज दाखल

$
0
0

टीम मटा
विधानसभा निवडणुकीचे अर्ज भरण्याच्या पाचव्या दिवशी जिल्ह्यातील १८ विधानसभा मतदारसंघांतून ६४ उमेदवारांनी ८२ अर्ज दाखल केल्याचे समोर आले असून त्यामध्ये भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेस, मनसे आणि अपक्ष उमेदवारांची संख्या मोठी आहे. उमेदवारी अर्ज दाखल करताना पक्षाच्या कार्यकर्त्यांची आणि समर्थकांची मोठी रॅली शहरातून काढण्यात आल्यामुळे गर्दी उसळली होती. ठाण्यातून संजय केळकर, डोंबिवलीतून रवींद्र चव्हाण, कल्याण पूर्वेतून गणपत गायकवाड यांनी भाजपकडून तर मनसेचे कल्याण ग्रामीणचे उमेदवार राजू पाटील यांनी अर्ज दाखल केला. तर शक्तिप्रदर्शनामुळे निर्माण झालेल्या गर्दीने अर्ज दाखल करण्यासाठी अडचणी आल्या आणि उमेदवारांची चांगलीच दमछाक झाली.

ठाणे शहरातून भाजपचे उमेदवार संजय केळकर यांनी घंटाळी येथून रॅली काढून जिल्हाधिकारी कार्यालयात समर्थक कार्यकर्ते आणि महायुतीच्या घटकपक्षांतील नेत्यांच्या उपस्थितीत अर्ज दाखल केला. यावेळी पालकमंत्री एकनाथ शिंदे आणि शिवसेनेचे कार्यकर्तेही उपस्थित होते. कल्याण पूर्व विधानसभा मतदारसंघातून महायुतीचे भाजपचे उमेदवार आमदार गणपत गायकवाड यांनी शक्तिप्रदर्शन करीत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. परंतु हा मतदारसंघ मिळवण्यासाठी शिवसेना इच्छुक असल्यामुळे शिवसेनेचे पदाधिकारी यावेळी उपस्थित नव्हते. त्यामुळे शिवसेनेशिवाय गायकवाड यांनी शक्तिप्रदर्शन करून अर्ज दाखल केला.

डोंबिवली शहरात सकाळी प्रचंड ताकद दाखवत भाजपचे उमेदवार रवींद्र चव्हाण यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. मागील दोन निवडणुकीत चव्हाण या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत असून कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत त्यांनी अर्ज दाखल केला. तर कल्याण ग्रामीणमधून मनसेचे प्रमोद (राजू) पाटील यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. मनसेमधून २००९ मध्ये राजू पाटील यांचे बंधू रमेश पाटील यांनी या मतदारसंघामध्ये नेतृत्व केले होते. तर गतवर्षी शिवसेने हा मतदारसंघ जिंकला होता.

चव्हाण यांची बाइकस्वारी…

उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी काढलेला मुहूर्त गाठण्यासाठी चव्हाण यांनी सकाळी लवकर रॅलीची वेळ निश्चित केली होती. मात्र कार्यकर्ते जमा होत रॅली सुरू होण्यास विलंब झाला. त्यातच प्रचंड शक्तिप्रदर्शनामुळे चारचाकी गाडीतून निवडणूक कार्यालयापर्यंत पोहोचणे अशक्य असल्याचे लक्षात आल्याने अखेर मुहूर्त गाठण्यासाठी चव्हाण यांनी बाइकचा आधार घेतला. चव्हाण यांच्या बाइकचे सारथ्य चक्क खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी केले. यामुळे खासदार आणि राज्यमंत्र्याची बाइकस्वारी शहरात चर्चेचा विषय बनली.

शक्ती प्रदर्शनामुळे वाहतूक कोंडी…

डोंबिवली, कल्याण पूर्व, आणि कल्याण ग्रामीण मधून आज दिग्गज उमेदवारांनी उमेदवारी अर्ज भरताना शक्ती प्रदर्शन केल्याने शहरात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती. शहरातील सर्व रस्त्यावर वाहतुकीचा खोळंबा झाल्याने वाहतूक पोलिसांना अनेक मार्गावरील वाहतुकीत बदल करावा लागला. अचानक वाहतुकीत बदल करण्यात आल्याने सर्वच शहरात वाहन चालकांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागला. उखडलेले खड्डे त्यात वाहतूक कोंडी यामुळे वाहनचालकांनी त्रागा आणि नाराजी व्यक्त करत मतदाराच्या त्रासाचा उमेदवारांनी विचार करावा यासारख्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शक्तिप्रदर्शन जोरात, अर्ज प्रतीक्षेत

$
0
0

आव्हाड आज निवडक नगरसेवकांसह उमेदवारी दाखल करणार

म. टा. प्रतिनिधी, ठाणे

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थिती गुरुवारी कळवा-मुंब्रा विधानसभा मतदारसंघातील विद्यमान आमदार जितेंद्र आव्हाड यांनी समर्थकांच्या ताकदीचे दर्शन घडवले. ढोलताशांचा गजर, फटाक्यांची आतिषबाजी, कार्यकर्त्यांची उसळलेल्या गर्दीमुळे संपूर्ण मुंब्रा राष्ट्रवादीमय झाले होते. दोन तासांपेक्षा अधिक वेळ भर उन्हात प्रचाररथावर पवार यांच्यासह राष्ट्रवादीचे पदाधिकारी स्वार झाले होते. परंतु शक्तिप्रदर्शनानंतरही आव्हाड यांनी आपला उमेदवारी अर्ज भरला नसून शुक्रवारी काही नगरसेवकांना सोबत घेऊन अर्ज भरण्याचा निर्णय घेतला आहे.

मुंब्रा-कळवा विधानसभा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला असून या मतदारसंघातून सलग दोन वेळा जितेंद्र आव्हाड निवडून आले आहेत. यंदा त्यांची हॅटट्रिक आहे. गुरुवारी उमेदवारी अर्ज भरणार असून दस्तुरखुद्द पक्षाचे अध्यक्ष शरद पवार उपस्थित राहणार असल्याचे आधीच राष्ट्रवादीकडून जाहीर करण्यात आले होते. त्यानुसार दुपारी मुंब्रा रेल्वे स्थानकापासून रॅलीला सुरुवात झाली. प्रचार रथावर पवार यांच्यासह आव्हाड तसेच राष्ट्रवादीचे अन्य काही पदाधिकारी होते. ढोल ताशांच्या गजरामुळे संपूर्ण परिसर दणाणून गेला होता. कार्यकर्ते हातात झेंडे घेऊन झेंडे हवेत फिरवत होते. उन्हाचा पाराही चढला होता. रणरणत्या उन्ह्यात निघालेल्या या रॅलीत पवार यांच्यासह कन्हय्याकुमार हेही सहभागी झाले होते. पदाधिकारी पवार यांचे जोरदार स्वागतही करत होते. फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली. 'कोण आला रे कोण आला, राष्ट्रवादीचा वाघ आला', आदी जोरदार घोषणाही देण्यात आल्या.

कौसा येथील निवडणूक कार्यालयाच्या बाहेर काही अंतरावर ही रॅली आली. मात्र या शक्तिप्रदर्शनानंतरही आव्हाड यांनी आपला उमदेवारी अर्ज भरला नाही. त्यामुळे आश्चर्य व्यक्त होत आहे. गर्दी मोठ्या प्रमाणावर झाली होती. त्यामुळे नगरसेवकही विखुरले होते. नगरसेवक सोबत न घेता अर्ज भरला असता तर वेगळा संदेश गेला होता. त्यामुळे उमेदवारी अर्ज भरला नसल्याचे आव्हाड यांनी सांगितले.

वाहतूककोंडीने मनस्ताप

आव्हाड यांच्या शक्तिप्रदर्शनामुळे मुंब्रा परिसरात मोठ्या प्रमाणावर वाहतूककोंडी झाली होती. रस्त्याच्या एका बाजूने ही रॅली निघाल्याने हा रस्ता वाहतुकीसाठी बंद होता. मात्र दुसऱ्या बाजूकडील रस्त्यावरही कोंडीत गाड्या अडकल्या होत्या. याचा नाहक त्रास नागरिकांना सहन करावा लागला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 44332 articles
Browse latest View live


<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>