शिक्षण हक्क कायद्यानुसार सर्व प्राथमिक शिक्षकांसाठी शिक्षक पात्रता परीक्षा बंधनकारक झाली आहे. या परीक्षेसाठी राज्यातून तब्बल सव्वासहा लाख इच्छुकांनी अर्ज केला आहे. मात्र मे, २०१२पासून शिक्षक भरती झालेली नसतानाही राज्यात शिक्षकांच्या रिक्त जागा आहेत, अवघ्या १७ हजार. म्हणजेच या इच्छुकांपैकी तब्बल ९७ टक्के उमेदवार नोकरीविनाच राहणार हे भीषण चित्र उजेडात आले आहे.
↧