परदेशात विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचे माध्यम कटाक्षाने मातृभाषाच असते. भारतातही विविध क्षेत्रांत आपल्या कर्तृत्वाची पताका फडकवलेल्यांचे शिक्षण इंग्रजी माध्यमातून झाले नव्हते. परंतु त्याकडे दुर्लक्ष करुन आपण मायबोली मराठीला विसरत चाललो आहोत, अशी खंत व्यक्त करत या परिस्थितीला केवळ सरकार नाही तर सर्वसामान्य मराठी माणूसदेखील जबाबदार आहे, अशी टीका अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाध्यक्ष डॉ. नागनाथ कोत्तापल्ले यांनी ठाण्यात केली.
↧