सरकारी यंत्रणेविरोधात जव्हार तालुक्यातील आदिवासींनी आधुनिक पध्दतीने सत्याग्रह पुकारला आहे. सोमवारी येथील तब्बल ६८७ आदिवासींनी हक्काच्या जमीनपट्ट्यासाठी जव्हार येथील अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयात माहिती अधिकारात अर्ज करुन आपला हक्क अमान्य का झाला याबाबत विचारणा केली आहे.
↧