ठाण्यातील ‘साईराज’ ही अनधिकृत इमारत ७ नोव्हेंबर १९९८ साली कोसळून १७ जण मृत्यूमुखी पडले होते. याप्रकरणी तत्कालीन पालिका उपायुक्तांसह १२ अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली. काही जणांना अटकही झाली. सरकारने नेमलेल्या चौकशी समितीने अधिकाऱ्यांवरील दोषही निश्चित केले. मात्र, लोकप्रतिनिधींनी तो अहवाल केराच्या टोपलीत टाकून सर्व अधिकाऱ्यांची पालिकेत पुर्नस्थापना केली.
↧