महाराष्ट्र दुष्काळात होरपळत असताना धुळवडीच्या निमित्ताने नागपुरात पाण्याची नासाडी करून टीकेचे लक्ष्य झालेले आध्यात्मिक गुरू आसारामबापू यांचा सोमवारचा नवी मुंबईतील धुळवडीचा सत्संगही वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. या कार्यक्रमाच्या वार्तांकनासाठी निमंत्रित केलेल्या मीडियाच्या प्रतिनिधींना आसारामबापूंच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या बेदम मारहाणीत पाचजण जखमी झाले.
↧