दिवाळी बोनस व किमान वेतनाच्या मागणीसाठी वसई गावातील पालिकेच्या कंत्राटी सफाई कामगारांनी गुरुवारी रात्रीपासून पुन्हा काम बंद आंदोलन केले. त्यामुळे शुक्रवारी दुपारपर्यंत वसई गावातील अनेक भागात कचरा उचलला गेला नाही. याप्रकरणी पालिकेने एकदाच काय तोडगा काढावा, अशी मागणी नागरिक करत आहेत.
↧