ठाणे महापालिका प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे जागोजागी बेकायदा इमारती उभ्या राहिल्याचा आरोप करत, पालिका हद्दीतील धोकादायक इमारतींच्या स्ट्रक्चरल ऑडिटचा खर्च ठाणे पालिकेनेच उचलावा, अशी मागणी नुकतीच राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष जितेंद्र आव्हाड यांनी केली असली तरी ती जबाबदारी अशा इमारतीतील रहिवाशांचीच असल्याचे पालिका आयुक्त असीम गुप्ता यांनी स्पष्ट केले आहे.
↧