दीड वर्षापूर्वी २९६ कोटी रुपये खर्च करून ठाण्यातील रस्त्यांचे सक्षमीकरण झाले. पुढील तीन वर्षे त्या रस्त्यांवर खड्डे पडणार नाही असा दावा प्रशासनाने केला होता. परंतु, त्यातील बहुसंख्य रस्ते आज खड्डयात गेल्याने पालिकेचा दावा फोल ठरलाय. या कामांच्या टेंडर प्रक्रियेपासून ठेकेदारांना दिलेल्या मुदतवाढ आणि भाववाढीची चौकशी झाली तर त्यातील गैरव्यवहार चव्हाट्यावर येऊ शकतो असे सूत्रांचे म्हणणे आहे.
↧