वीजबिलांची शंभर टक्के वसुली होणाऱ्या डोंबिवलीने राज्यात सर्वात कमी वीजगळतीचा विक्रम नोंदवला आहे. डोंबिवलीतील वीज गळतीचे प्रमाण अवघ्या ८ पूर्णांक ८४ दशांशवर आले असून सन २००६ मध्ये हे प्रमाण २५ पूर्णांक ९२ दशांश इतके होते. कमर्शिअल व टेक्निकल लॉसेस कमी करण्यासाठी सातत्याने केलेल्या प्रयत्नांमुळे हे उद्दिष्ट साध्य करता आल्याची माहिती महावितरणच्या सूत्रांनी दिली.
↧