कल्याण-डोंबिवलीतील धोकादायक इमारती पावसाळ्यापूर्वी पाडण्याची केडीएमसीची मोहीम प्रत्यक्षात कागदावरच राहिली असली तरी मुंबईत माहीम येथे इमारत कोसळून बळी गेल्यावर मात्र पालिकेला जाग आली आहे. कल्याणातील शिवाजी चौकातील ९० वर्षांपूर्वीची धोकादायक इमारतीसह डोंबिवलीतील चार इमारती पाडण्याचे काम मंगळवारी सुरू झाले.
↧