भरमसाठ आर्थिक नफ्याचे आमिष दाखवून ठाणे जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांना सरकारी आणि खासगी संस्थांनी इमूपालनाकडे आकर्षित केले. मात्र, आता या इमूची अपेक्षेनुसार विक्री होत नसून त्यांच्या अंड्यांनाही भाव मिळेनासा झाला आहे. त्यामुळे कर्ज काढून या व्यवसायात उतरलेल्या शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी झाली आहे.
↧