कल्याण पूर्वेतील पाणी टंचाईवरून सोमवारी अधिकाऱ्याला मारहाण आणि एमआयडीसी कार्यालयात मोडतोड झाल्यानंतर मंगळवारी एमआयडीसीच्या पाणी पुरवठा विभागाच्या कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन सुरू केले. यामुळे आता कल्याण पूर्व आणि डोंबिवली पश्चिमेत कमी दाबाने पाणी पुरवठा होण्याची शक्यता आहे. केडीएमसी आणि एमआयडीसीच्या भांडणांनी जनतेला वेठीस धरले असून, यामुळे संतापाचे वातावरण आहे.
↧