गेल्या २७ वर्षांपासून प्रतिक्षेत असलेले ठाणे जिल्ह्याचे विभाजन १ मे रोजी होईल हे राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी विधिमंडळात दिलेले आश्वासन हवेत विरले आहे. तांत्रिक आणि आर्थिक कारणांमुळे विभाजनाचा पुन्हा खोळंबा झाला आहे. दुभाजन होता होता नाकी नऊ आले असताना जिल्ह्याचे पालकमंत्री गणेश नाईकांची जिल्हा चौभाजनाची आस मात्र कायम आहे.
↧