विरार जवळील अर्नाळा, भाईंदर हद्दीतील उत्तन व पालघर तालुक्यातील केळवे अशा तीन ठिकाणी सागरी पोलिस ठाणी मंगळवारपासून कार्यान्वित झाली आहेत. ठाणे ग्रामीण पोलिस अधीक्षक अनिल कुंभारे यांच्या हस्ते तीनही पोलिस ठाण्यांची औपचारित उदघाटने करून ही नवनिर्मित पोलिस ठाणी लोकांच्या सेवेत रूजू झाली.
↧