गंभीर पाणी समस्येला तोंड देणाऱ्या कल्याण-डोंबिवली शहरांमध्ये पालिकेने अव्वाच्या सव्वा बिल देऊन नागरिकांच्या तोंडचे पाणी पळवले आहे. २१ फेब्रुवारीपासून पालिकेच्या वतीने नागरिकांना नव्याने बिल वाटप करण्यात येत असून, हे बिल चक्क तीन वर्षांचे आहे. विशेष म्हणजे हे बिल देताना कोणत्याही प्रकारचे मीटर रीडिंग न घेतल्याने सगळी बिले मीटर रीडिंगच्या तुलनेत अधिक आहेत.
↧